

Administrative Delays Trigger Anger Among Candidates
Sakal
अकोला : नगरपरिषद निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत प्रशासन मोठमोठे दावे करत असले, तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी प्रशासनाची गती कासवपेक्षाही संथ ठरल्याचे चित्र समोर आले. माघारीची अंतिम मुदत संपून संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतही जिल्हा प्रशासनाकडून किती उमेदवार रिंगणात राहिले, याची अधिकृत आकडेवारी जाहीर न झाल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हेच काय गतिमान प्रशासन? असा तिखट सवाल उमेदवारांकडून सार्वजनिकपणे केला जात आहे.