रिसोड (जि.वाशीम) ः विहिरीत व सिंचन प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असूनही महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे कोरडवाहू शेती करण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे आरोप होत आहे.
हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी परंतु, महावितरणाच्या सुलतानी धोरणामुळे सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्यामुळे तसेच रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाढण्याच्या मार्गावर असून, रब्बी हंगाम हातून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिलेच परतीच्या पावसाने सोयाबीनचे पीक शेतकऱ्याच्या हातून गेले. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. त्यातून कसेबसे सावरत उसनवारीवर रब्बीची पेरणी केली. विहिरी तसेच सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा असूनही वीज नसल्यामुळे रब्बीची पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा तसेच नियमित वीजपुरवठा नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जळालेले रोहित्र त्वरित बदलून द्या, दिवसा व सुरळीत वीज पुरवठा करा, अशा मागण्या शेतकऱ्यांसह विविध संघटना करीत आहेत. हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी (संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.