
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. इच्छुकांच्या दस्तऐवज गोळा करण्याची धावपळच सुरू असल्याने जिल्ह्यात तेल्हारा व बाळापूर वगळता इतर तालुक्यात उमेदवारी अर्जांची संख्या पहिल्या दिवशी निरंक होती.
अकोला : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. इच्छुकांच्या दस्तऐवज गोळा करण्याची धावपळच सुरू असल्याने जिल्ह्यात तेल्हारा व बाळापूर वगळता इतर तालुक्यात उमेदवारी अर्जांची संख्या पहिल्या दिवशी निरंक होती. जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत बुधवार (ता. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. इच्छुक ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार बुधवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी कागदपत्र गोळा करण्यातच इच्छुकांचा वेळ गेला. त्यामुळे जिह्यात २२५ ग्रामपंचायतींसाठी केवळ सात अर्ज दाखल झाले. या सात अर्जांपैकी तेल्हारा तालुक्यात सहा तर बाळापूर तालुक्यात लोहारा ग्रामपंचायतसाठी एक अर्ज दाखल झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. हेही वाचा - एका तासात नववधूचा केला ऑनलाईन मेकअप असा आहे निवडणूक कार्यक्रम हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकन अर्जाचा डोक्याला ताप उमेदवारी अर्जांची स्थिती (संपादन - विवेक मेतकर) |
|||