अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे होणार !

Akola News: Punchnama will be held for agriculture affected due to heavy rains!
Akola News: Punchnama will be held for agriculture affected due to heavy rains!

वाशिम/ अकोला :   ८ ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना जिल्ह्यातील विदारक परिस्थिती  मांडून जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतीचे  पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.


सोयाबीन हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. परंतु 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये सोंगुण टाकलेली सोयाबीन, शेतात  लावलेल्या सुड्याच्या गंज्या व शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  

याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी जिल्ह्यातील विदारक स्थितीची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे मांडून नुकसान ग्रस्त शेतातील पिकांचे सर्वेक्षण तथा पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती.

याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  दखल घेत तातडीने  पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.यामुळे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com