तरोडा (जि.अकोला) ः अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत पनोरीमधील पठार नदीवरील पुलामुळे तेथील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना दवाखान्यात न्यायला सुद्धा दुसरा पर्याय नाही. लोकप्रतिनिधीना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी नदी पात्रात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीत बाहेर गावी जावे लागते. नदीला पूर आल्यावर विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावातील नदीवरील पूल लवकरात लवकर व्हावा यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी आजपासून नदीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पुलाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय पनोरी गावकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनात विजय दाते, गणेश बुटे, तुकाराम कडू, राहुल वानखडे, प्रवीण फुकट, प्रमोद बुटे, आदीनाथ खोबरंखडे, दयाल म्हातुरकर, हरिदास बुटे, सुरेश बुंदे, हेमंत मेतकर, दिगंबर बुंदे, ज्ञानेश्वर दाते, रोशन वानखडे, राजू राणे, कुलदीप बडदिया, राजू बुटे, शुभम बुटे आदींसह गावकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. महिलांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. आमदार मिटकरीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे (संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.