
पावसाळा संपतात शहरातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. त्यात प्रभाग १७ चा समावेश असून, येथील महिलांनी नगरसेविकेच्या नेतृत्वात महानगरपालिका कार्यालयावर घागर मोर्चा काढला.
अकोला : पावसाळा संपतात शहरातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. त्यात प्रभाग १७ चा समावेश असून, येथील महिलांनी नगरसेविकेच्या नेतृत्वात महानगरपालिका कार्यालयावर घागर मोर्चा काढला. अकोला शहरातील जुने शहर परिसरात प्रभाग क्रमांक १७ मध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रभागात पाणीपुरवठ्यासाठी असलेली बोअर वेल अनेक दिवसांपासून बंद आहे. शिवाय हातपंपही बंद आहेत. हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी याकडे नागरिकांनी वारंवार महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र अद्यापही पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर मनपातर्फे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करण्याची वेळ आली. परिणामी या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका सपना अश्निन नवले यांच्या नेतृत्त्वात महिलांनी मनपावर घागर मोर्चा काढून निषेध नोंदविला. आयुक्तांना दिले निवेदन हेही वाचा - प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’ प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी अमृतची कामेही अर्धवट (संपादन - विवेक मेतकर) |
|||