खरीपासाठी बळीराजा सज्ज

शेतकऱ्यांची घरगुती बियाण्यांना पसंती
kharip
kharipSakal

मालेगांव - खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. मात्र जुनचे १५ दिवस उटले तरी अपेक्षित पाऊस नसल्याने पावसांची प्रतीक्षा करीत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी घरगुती बियाणांना पसंती देत असल्याचे पहायला मिळत आहे. महागाईने कळस गाठला असून बाजारातील बियाणे परवडत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मालेगाव शहरासह ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर नामांकित कंपनीचे बियाणे बाजारामध्ये उपलब्ध झाले आहे. परंतु घरगुती बियाणांपेक्षा कंपनीचे दर दुप्पट असल्याने शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांना पसंती दशविली आहे. खरीपामध्ये मुख्य पीक म्हणून सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांना शेतकरी प्रथम पसंती देत आहेत.

दरवर्षी शेतकऱ्यांना संकटांना समोरे जावे लागते. या वर्षी वेळोवेळी कृषी विभागाचे योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे, पेरण्याचा सल्ला दिला जातो. घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी प्रात्यक्षिके केली. या वर्षी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरण्याकडे कल आहे. त्यामुळे खर्च कमी होऊन उत्पन्न, वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा खताचे भाव वाढले असल्याने लागवड खर्च पाहता उत्पन्न कमी असे गणित आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेतही आहेत.

७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी : कृषी विभाग

रिसोड - शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन रिसोड कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.मान्सून नुकताच दाखल होत आहे. अजुन मान्सूनचा सार्वत्रिक पाऊस पडलेला नाही. जो पाऊस पडला तो वळिवाचा आहे,, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये योग्य प्रमाणात म्हणजेच ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी. तसेच पेरणीसाठी शक्‍यतो घरचे बियाणे बीजप्रक्रिया करूनच वापरावे. मान्सूनचा पाऊस हा सर्वदूर व सार्वत्रिक झालेला नाही.

काही शेतकरी पेरणीची घाई करतात व नंतर त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागते. जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजेच ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची व इतर पिकांची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप व एन. एन. जोशी कृषी अधिकारी पंचायत समिती रिसोड यांनी केले आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे

खरीपाच्या हंगामासाठी बळीराजा सर्व तयारी पूर्ण करू सज्ज असला तरी जुनचे १५ दिवस उलटले तरी पावसाळा सुरु झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com