जऊळका रेल्वे : मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो’ असे सांगून एका निर्दयी बापाने उपाशीपोटी असलेल्या आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांना जऊळका रेल्वेस्थानकावर सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. सखाराम जाधव रा. धोत्रा जि. हिंगोली असे या बापाचे नाव आहे.
मालेगाव तालुक्यातील वरदरी येथे सासुरवाडी असलेल्या सखाराम जाधव हा आपल्या ६ वर्षीय साहिल व ८ वर्षीय आदित्य या मुलांना सोबत घेऊन पत्नीसोबत भांडण करून पुणे येथून घरी धोत्रा येथे आला. तेथून आज सकाळी पूर्णा अकोला पॅसेंजरने चिमुकल्यांसह जऊळका रेल्वे स्टेशनवर उतरला. दोन्ही मुलांना फलाटावर बसवून खाऊ आणण्यासाठी जातो म्हणून निघून गेला. मात्र, तब्बल ५ तास उलटूनसुद्धा तो न आल्याने लहानग्या साहिल व आदित्यला अश्रू अनावर झाले.
या घटनेची माहिती निर्भया पथक व पोलिस पाटील विजय सरोदे यांना मिळाली. लगेच फलाटावर पोहोचून मुलांची शहानिशा करून ताब्यात घेण्यात आले. उपाशी असलेल्या मुलांना पाणी व जेवण दिले. निर्भया पथकाच्या पोलिस कर्मचारी शीतल सरनाईक व पोलिस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी अवघ्या ५ तासांत वडिलाचा शोध घेऊन मुलांना वडील व मामाच्या स्वाधीन केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.