अ‍ॅग्रो

शेतीवर असलेले व्यवसाय कोलमडले

सकाळवृत्तसेवा

औसा - मागील तीन-चार वर्षे सतत पावसाअभावी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा आर्थिक संकटात लोटले होते. या वर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण पेरण्यांनंतर तब्बल दीड महिना पाऊस गायब झाला आणि बहरात असलेल्या पिकांचा पाण्याअभावी धुराळा झाला. पावसाअभावी शेतकरी कोलमडून पडलाच; पण शेतीवर अवलंबून असलेले विविध व्यवसायांचेही कंबरडे मोडले गेले. बाजारपेठेलाही याचा मोठा फटका बसला आहे.

औसा तालुक्‍यात १ लाखाच्या वर क्षेत्र खरिपाचे असून यावर्षी १ लाख पाच हजार हेक्‍टरवर पेरण्या झाल्या. यामध्ये ६५ हजार हेक्‍टरवर सोयाबीन, ७ हजार २३५ हेक्‍टरवर मूग, तर ९ हजार ८१६ हेक्‍टरवर ही कमी कालावधीची पिके शेतकऱ्यांनी घेतली. मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली, सोयाबीन पेरणीनंतर पंधरा ते पंचवीस दिवसांत तणनाशके व त्यानंतर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. रोग व किडीचा प्रादुर्भाव पाहून आणखी फवारण्या कराव्या लागतात. बाजारपेठेत यामुळे कोट्यवधींची उलाढाल होते, उत्पादनही त्याच पटीत येत असल्याने शेतकरीही खर्च करीत असतो; परंतु सुरवातीला तोंड दाखविलेल्या पावसाने जुलै महिना व ऑगस्टचे पंधरा दिवस विश्रांती घेतली. पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांनी तणनाशकांच्या फवारणीकडे पाठ फिरविली आणि करोडो रुपयांची तणनाशके दुकानदारांकडे पडून राहिली. त्यानंतरही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी फवारण्या केल्या नाही. सोयाबीन हे नव्वद ते एकशे वीस दिवसांचे पीक असल्याने जून ते ऑगस्टपर्यंत दरवर्षी कृषी सेवा केंद्रचालकांचा व्यवसाय वार्षिक उलाढालीच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्के असतो. यंदा मात्र पंधरा ते वीस टक्केच व्यवसाय झाला आहे. 

शेतकऱ्यांना खुरपणी, कोळपणी, फवारणीसह मशागतीची कामे करावी लागतात; पण पावसाअभावी पिके करपून गेल्याने या सर्वांवरच गंडातर आले. सुकलेल्या पिकांकडे पाहून शेतीत आणखी खर्च करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नसल्याने शेतीवर अवलंबून असणारे शेतमजूर, व्यावसायिकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. 

पावसाने खंड दिल्याने खडकाळ जमिनीवरील पिके हातची गेली असून कसदार जमिनीतही म्हणावे तसे उत्पन्न हाती लागणार नाही. पावसानंतर सोयाबीनच्या शेगांना गळती लागली असून ज्या शेंगा झाडावर आहेत, त्यांनाही अळ्यांनी पोखरले आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्‍यता आहे. शेतमालावर अवलंबून असलेल्या आडत व्यापाऱ्यांतही भीतीचे वातावरण आहे. पावसाच्या खंडाचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून पावसानंतरही बाजारपेठा थंडच आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस असाच सुरू राहिला, तर रब्बी हंगामाला त्याचा फायदा होईल; पण खरीप हातचे गेल्याने आर्थिक गणित कोलमडले असून रब्बीसाठी खर्च करण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती राहिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT