Air-India
Air-India 
अर्थविश्व

एअर इंडियाचे खासगीकरण होणार

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - एअर इंडिया डबघाईला आली असली तरी ही विमान कंपनी बंद करणे व्यावहारिक व उचित नाही. त्यामुळे केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून एअर इंडियाला ऊर्जितावस्था आणण्याचे ठामपणे ठरविल्याची माहिती आज राज्यसभेत देण्यात आली. दररोज किमान १५ कोटींचा तोटा सहन करणाऱ्या एअर इंडियाला येत्या ऑक्‍टोबरनंतर कर्मचाऱ्यांचे पगार देणेही अशक्‍य होईल असे मुलकी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले. पुरी यांनी नुकतेच याबाबतचे ट्‌विटही केले होते.

संभाजीराजे छत्रपती व इतरांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना पुरी यांनी सांगितले, की एअर इंडियाची परिस्थिती सुधारण्यासाठी निर्गुंतवणूक हाच पर्याय आहे. एअर इंडिया बंद करणे हा पर्याय असू शकत नाही. त्यापेक्षा एअर इंडियाचे खासगीकरण शक्‍य आहे. एअर इंडिया या कंपनीपुढे आर्थिक संकट आ वासून उभे राहिले आहे. ज्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणे कठीण होईल अशी शक्‍यता आहे. अशात आता खासगीकरणाचा पर्याय सुचवण्यात आला आहे. एअर इंडियाला सरकारने सात हजार कोटींची सॉव्हरिन हमी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

World Asthama Day 2024 : तुमचं वाढलेलं वजन दम्याला अधिकच गंभीर बनवते, हे खरंय का?

SCROLL FOR NEXT