नवी दिल्ली : पती हा पत्नीचा मालक नसून, महिलांना सन्मान दिलाच पाहिजे. महिलांना समान अधिकार असल्याचे सांगत विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याने कलम 497 रद्द करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) व्यभिचारासंदर्भात (म्हणजे विवाहानंतर शारिरीक संबंधांबाबत) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश खानविलकर यांनी 497 कलम महिलांचा आदर राखणारे नसल्याचे सांगत सांगत ते रद्द करत असल्याचे सांगितले. या कलमामुळे महिला या पुरुषांच्या हातातील खेळणे झाल्या होत्या. पण, आता महिलांनाही सन्मान मिळालाच पाहिजे.
व्यभिचार हा गुन्हा होऊच शकत नाही. चीन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपात व्यभिचार हा अपराध नाही. त्यामुळे न्यायालयही या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देऊ शकत नाही. पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. महिलांची प्रतिष्ठा हीच महत्त्वाची आहे. पत्नी ही 24 तास पती आणि मुलांची सर्वांत जास्त काळजी घेत असते. त्यामुळे त्यांना सन्मान मिळालाच पाहिजे. समान अधिकार हा महत्त्वाचा असून, कायदा महिलांबाबत भेदभाव करू शकत नाही. व्यभिचारामुळे आत्महत्या किंवा अन्य गुन्हे घडण्यापेक्षा त्यामध्ये चूक काहीच नाही. जे वैवाहिक जीवनात आनंदी नाहीत, ज्यांचे संबंध तुटण्याच्या मार्गावर आहेत, यांच्यासाठी हा गुन्हा होऊच नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.