agnipath scheme navy chief admiral r hari kumar on agnipath scheme  
देश

अग्निपथ योजनेला असा विरोध अपेक्षित नव्हता; नौदल प्रमुखांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान या नवीन भरती योजनेचे फायदे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना नौदल प्रमुख, अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या योजनेचे समर्थन केले आहे. (agnipath scheme navy chief admiral r hari kumar on agnipath scheme)

देशभरात या योजनेला विरोध होत असताना, नौदल प्रमुख म्हणाले की, अग्निपथ योजनेला असा विरोध अपेक्षित नव्हता. त्यांनी भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील सर्वात मोठे परिवर्तन म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अॅडमिरल कुमार म्हणाले की, त्यांनी अग्निपथ योजनेसाठी सुमारे दीड वर्ष काम केले आहे.

एएनआयशी बोलताना ते म्हणाले, मी योजना टीमचा एक भाग होतो आणि या योजनेवर सुमारे दीड वर्ष काम केले. ही एक परिवर्तन घडवून आणणारी योजना आहे आणि सशस्त्र दलांमध्ये अनेक प्रकारे बदल घडवून आणेल. अॅडमिरल कुमार म्हणाले, ही योजना देशासाठी आणि तरुणांसाठी फायदेशीर आहे, कारण ती तरूणांना अधिक संधी मिळवून देते.

ते पुढे म्हणाले की, मला वाटते की, या योजनेबद्दल चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे ही निदर्शने होत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, जेथे पूर्वी केवळ एका व्यक्तीला सैन्यदलात सेवा करण्याची संधी मिळायची, आता ती चार जणांना मिळेल. कमी कालावधीतील सेवेबाबत आपले मत मांडताना ते म्हणाले, याचे अनेक फायदे आहेत. अग्निवीरांना सशस्त्र सेवा करिअर म्हणून करायचे की, दुसरी नोकरी करायची हे ठरवण्याची संधी मिळेल.

योजनेला जोरदार विरोध होतोय

'अग्निपथ' या लष्करातील भरतीच्या नव्या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. शुक्रवारी देशातील किमान सात राज्यांमध्ये निदर्शने करण्यात आली. बिहार आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू झालेला विरोधाचा वणवा अनेक राज्यांमध्ये पोहोचला आहे. तेलंगणामध्ये शुक्रवारी विरोध आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर या निदर्शनात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरील या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे वृत्त आहे आणि तेथे जाळपोळ झाली, त्यानंतर पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. यादरम्यान एकाचा जीव गेला तर १५ हून अधिक जण जखमी झाले. अग्निपथ योजनेला विरोध केल्याने ३४० हून अधिक रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये गाड्या जाळण्यात देखील आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT