भटिंडा : निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट हल्ल्यावरून रडारबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांची खिल्ली उडविण्यात आली. आता मोदींच्या या वक्तव्याचे भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख रघुनाथ नांबियर यांनी केले असून, जास्त ढग असतील तर रडार व्यवस्थित काम करत नाही असे म्हटले आहे.
ढगाळ वातावरणामुळे भारतीय हवाई दलाचे अधिकारी बालाकोट एअर स्ट्राईक पुढे ढकलण्याच्या विचारात होते. परंतु, ढगांमुळे रडारपासून विमानांचा बचाव होईल, असे मी त्यांना सांगितले. त्यामुळे नियोजित दिवशीच बालाकोट एअर स्ट्राईक झाला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र, ढगांमुळे रडारपासून विमानांचा बचाव होतो, या दाव्यावरून अनेकांनी मोदींची खिल्ली उडविली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींचे हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. अनेकांनी मोदींचा हा दावा हास्यास्पद ठरवला होता.
पण, आता रघुनाथ नांबियार यांनी मोदिंच्या दाव्याचे समर्थन करत म्हटले आहे, की आकाशात ढग जास्त असतील तर एखाद्या विमानाचा शोध लावण्यात रडारला अडथळे येऊ शकतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दावा काही प्रमाणात खरा असू शकतो. यापूर्वी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही केरळमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. प्रत्येक रडार वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार काम करते. त्यामुळे काही रडारमध्ये ढगांच्या पलिकडे जाण्याची क्षमता असते तर काहींमध्ये नसते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.