Cancelling Article 370 Esakal
देश

Cancelling Article 370: "कलम 370 पुन्हा लागू करणार," निवडणूक जाहीर होताच माजी मुख्यमंत्र्याचे आश्वासन

Cancelling Article 370: जम्मू काश्‍मीरला 1953 पूर्वी जो घटनात्मक दर्जा होता, तो परत मिळावा अशी मागणी करणारा ठराव येथील विधानसभेने 2000 साली मंजूर केला होता.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

जम्मू-काश्‍मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच केंद्र सरकारने रद्द केलेले 370 वे कलम पुन्हा लागू करण्याचे आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला.

या जाहीरनाम्याद्वारे जनतेला 12 आश्‍वासने देण्यात आली आहेत. जम्मू काश्‍मीरला पूर्ण राज्याचा मिळवून देत 24 वर्षांपूर्वी येथील विधानसभेने स्वायत्ततेबाबत मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

तसेच, विशेष दर्जा देणारे कलम 370 देखील पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले.

आम्ही फक्त अंमलबजावणी योग्य आश्‍वासनेच दिली असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, हा जाहीरनामा म्हणजे आमच्या पक्षाचे व्हीजन डॉक्युमेंट’ असल्याचेही अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितले.

जम्मू काश्‍मीरला 1953 पूर्वी जो घटनात्मक दर्जा होता, तो परत मिळावा अशी मागणी करणारा ठराव येथील विधानसभेने 2000 साली मंजूर केला होता. त्यावेळी फारुख अब्दुल्ला राज्याचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ठराव फेटाळून लावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT