Chief Justice DY Chandrachud
Chief Justice DY Chandrachud esakal
देश

DY Chandrachud : ..म्हणून न्यायाधीश जामीन देण्यास घाबरतात; सरन्यायाधीशांनी स्पष्टच सांगितलं कारण

सकाळ डिजिटल टीम

कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांनी जामीन न दिल्यामुळं उच्च न्यायालये जामीन अर्जांनी भरून गेली आहेत.

देशातील कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्यास विलंब होऊ नये आणि न्यायालयातील प्रलंबित खटले लवकरात-लवकर निकाली काढले जावेत, अशी इच्छा भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांनी व्यक्त केली. शनिवारी बार कौन्सिल ऑफ इंडियानं (Bar Council of India) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रचूड म्हणाले, टार्गेट होण्याच्या भीतीनं जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात. कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांनी जामीन न दिल्यामुळं उच्च न्यायालये जामीन अर्जांनी भरून गेली आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेत जिल्हा न्यायालये जितकी महत्त्वाची आहेत, तितकीच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये आहेत, असं त्यांनी सांगितलं.

कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात. त्यांना गुन्ह्यांचं गांभीर्य कळत नाही असं नाही, तर अनेक जघन्य प्रकरणांत जामीन मिळाल्यास त्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, अशी भीती त्यांना वाटते. म्हणून, ते जामीन देण्यास टाळाटाळ करतात. या भीतीमुळंच उच्च न्यायालये जामीन अर्जांनी भरून गेली आहेत. न्यायपालिका, जिल्हा न्यायव्यवस्था, न्यायिक पायाभूत सुविधा, कायदेशीर शिक्षण, न्यायव्यवस्थेतील महिलांचा सहभाग आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही चंद्रचूड यांनी माहिती दिली. बार कौन्सिल ऑफ इंडियानं चंद्रचूड यांची CJI म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू देखील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही राखीव दिवस; पावसामुळे सामना रद्द झाला तर कसा लागणार निकाल?

Latest Marathi News Live Update: बारामतीत बारावीचा निकाल 96.32 टक्के.....

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडद रंगाच्या लोकांना आफ्रिकन म्हंटले नाही; क्लिप केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून चुकीचा दावा

Mumbai Indians: 'निराशाजनक सिजन होता, पण...', नीता अंबांनीचा मुंबईच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित-हार्दिकलाही खास मेसेज

SCROLL FOR NEXT