देश

‘पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक’

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - पीक विमा ऐच्छिक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने आज जोरदार आगपाखड केली. पंतप्रधान पीक विमा योजना आणि हंगामी पीक विमा योजनेवर सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रीमियममध्ये १०० टक्के कपात करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची तोफ काँग्रेसने डागली. 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. पीक विमा योजनेमध्ये दोन टक्के प्रीमियम शेतकरी, तर ९८ टक्के प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकारतर्फे ५०-५० टक्के दिला जात होता. परंतु मोदी सरकारने काल तुघलकी फर्मान काढून केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रीमियमचे प्रमाण 25 टक्के केले. 

राज्यांनी ५० टक्के प्रीमियम देण्यास उशीर केला, तर दोन्ही पीक विमा योजना त्या राज्यांमध्ये बंद केल्या जातील, असेही सरकारने ठरविले आहे. असे असताना राज्य सरकारांनीही केंद्राप्रमाणे प्रीमियमला कात्री लावली तर गरीब शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार नाही. याखेरीज १५१ जिल्ह्यांसाठी नवी योजना बनविण्याचीही सरकारची घोषणा पाहता देशभरातील ७३२ जिल्ह्यांपैकी १५१ आपत्तिग्रस्त जिल्ह्यांना पीक विमा योजना लागू होणार नाही. साहजिकच सरकारचा निर्णय शेतकरी विरोधी आहे, असा हल्लाबोल सुरजेवाला यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT