rahul gandhi-narendra modi
rahul gandhi-narendra modi 
देश

काँग्रेसने गुजरातमध्ये कमावले की गमावले?

सकाळ डिजिटल टीम

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणूकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी काँग्रेसने गुजरातमध्ये कमावले की गमावले, हा खरा चर्चेचा मुद्दा आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून गुजरातमध्ये रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मायभूमीत काँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर निकाल नक्की काय लागणार? भाजपला फटका बसणार का? काँग्रेस विजयी होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

राहुल यांनीही प्रचाराची राळ उडविली होती. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. राजकीय मुद्यांबरोबर वैयक्तिक टीकाही झाली. हार्दिक पटेल यांच्यावर टीका करताना त्यांच्याशी संबंधित सेक्स क्लिपही व्हायरल झाली होती. नरेंद्र मोदी यांनी पन्नासहून अधिक प्रचारसभा घेतल्या. प्रचारादरम्यान ते अनेकदा भावूकही झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 150 हून अधिक जागा मिळवू, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मतदानानंतर ईव्हीएममधील तांत्रिक घोटाळ्यामुळे सहा ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागले होते. विविध गोष्टींमळे गुजरातची निवडणूक गाजली होती अन् याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

भाजपने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा दिल्यानंतर एकापाठोपाठ एक विजय मिळविण्यास सुरवात केली. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपकडे 7 राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या 4 वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाटेत भाजपचे 282 खासदार निवडून आले होते. भाजपने अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता मिळविलेली आहे. यामध्ये प्रमुख्याने जम्मू काश्मीर, बिहार, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि केरळमध्ये डाव्या पक्षांचे सरकार आहे. कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोराममध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षी मेघालय, नागालँड, त्रिपूरा, कर्नाटक, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवून काँग्रेसची वाढ करण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे आहे.

गुजरात प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी शेतकरी, मच्छिमार व व्यावसायिकांच्या मु्द्द्यांवर भर दिला होता. भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिल्याचे बोलले जात आहे. आजच्या निकालानंतर काँग्रेसने किती जागांवर विजय मिळविला हे स्पष्ट होईलच. परंतु, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी घेणार का? भाजपने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा दिलेला नारा खरा ठरणार का, हे भविष्यातच समजू शकेल. पण, सध्यातरी गुजरातमध्ये काँग्रेसने कमावले की गमावले? यावरच चर्चा करणे उचित ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT