देश

‘एचसीक्यू’चे दुष्परिणाम नाहीत 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्यांमुळे कोणतेही मोठे नुकसान/ दुष्परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही, अशा शब्दांत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या गोळ्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत असेही संशोधनात आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने ‘एचसीक्यू’चा वापर कोरोना रुग्णांवर करण्यास नुकतीच स्थगिती दिली आहे. या गोळ्यांमुळे मृत्यूही होऊ शकतो असा दावा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आला. त्याला आयसीएमआरने प्रत्युत्तर दिले आहे. संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोना विषाणू हा एक नवाच आजार आहे. त्यावर योग्य आणि प्रभावी वैद्यकीय उपचार काय हे जगात कोणालाच अजून माहिती नाही. ‘एचसीक्यू’ गोळ्या मुख्यतः मलेरियावर दिल्या जातात. कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून त्यांना अमेरिकेपासून जगभरातून वाढती मागणी आहे. भारतात या गोळ्यांचे जगाच्या तुलनेत ७० टक्के उत्पादन होते. मात्र या गोळ्यांच्या सरसकट आणि अतिवापराबद्दल खुद्द आरोग्य मंत्रालयाने मध्यंतरी सावधगिरीचा सल्ला दिला होता. रिकाम्यापोटी जे या गोळ्या घेतात त्यांना चक्कर येणे यासारखे विकार उद्भवू शकतात, असे आज स्पष्ट करण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या कोरोनावरील उपचारांबाबत ‘एम्स’सह दिल्लीतील तीन प्रतिष्ठित खाजगी रुग्णालयांनी संशोधन केले होते आणि त्यांच्या निरीक्षणानुसार या गोळ्या घेतल्याचे कोणतेही साईड इफेक्टस् नाहीत. यामुळे फार मोठा दुष्परिणाम होतो हेही आढळलेले नाही. मात्र या औषधाचा रुग्णांवर उपचार करताना ‘ईसीजी’ काढणे आवश्यक असल्याचेही अभ्यास पाहणीत नमूद करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मृत्यू दर आणि रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे या दोन्ही बाबतीत लॉकडाऊनच्या चारही टप्प्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देशात कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यातील ५० टक्के ज्येष्ठ नागरिक होते. त्यामुळे सरकार जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेत आहे असेही सरकारने म्हटले. 

दृष्टीक्षेपात भारतातील कोरोना 
६०४९० : बरे झालेले रुग्ण 
४१.६१ टक्के : बरे होण्याचे प्रमाण 
७.१ टक्के : मार्चमधील बरे होण्याचे प्रमाण 
१०.७ : दर एक लाख लोकांमागील रुग्ण 
२.८७ टक्के : मृत्यूदर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT