बाराबंकी: मतांच्या राजकारणासाठी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांकडे घराणेशाहीने दुर्लक्ष केले. मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकसारख्या वाईट प्रथेमुळे भेडसावणाऱ्या डोंगराएवढ्या समस्यांकडे मतांसाठी लक्ष दिले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोणत्याही पक्षाचे नाव न घेता केला.
बाराबंकी व अयोध्या जिल्ह्यांतील सभेत पंतप्रधानांनी प्रतिस्पर्ध्यांवर हा हल्ला चढवला. कोराना साथीच्या काळात विनामूल्य अन्नधान्यासह विविध कल्याणकारी योजनांचा गरीबांना लाभ मिळाला. त्यामुळे या गरीबांनी भाजपचा ध्वज हातात घेतल्याने विरोधक गोंधळले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
ते यावेळी म्हणाले, की आज जास्तीत जास्त संख्येने कमांडो होऊन मुली देश, समाजाचे संरक्षण करत आहेत. देशात सहासात वर्षांपूर्वी १.१० लाख महिला पोलिस होते. आज ही संख्या २.२५ लाखांवर गेली आहे. आपल्याला कुटुंब असल्याने ते नसणाऱ्यांपेक्षा आपण लोकांचे दु:ख समजू शकतो, असा दावा विरोधक करतात. मात्र, कुटुंब असण्याचा दावा करणाऱ्यांना तिहेरी तलाकनंतर माहेरी परतणाऱ्या मुस्लिम माताभगिनींचे दु:ख का समजले नाही, असा सवालही त्यांनी केला. घराणेशाहीने नेहमीच आपल्या मतपेढीची काळजी केली. त्यांनी तिहेरी तलाकचा सामना करणाऱ्या मुस्लिम महिलांसमोरच्या डोंगराएवढ्या समस्यांकडे डोळे झाकून दुर्लक्ष केले. मात्र, आमच्या सरकारने त्यांची तिहेरी तलाकच्या दृष्टचक्रातून सुटका केली, असा दावाही पंतप्रधानांनी केला.
शेतकऱ्यांचे हित सरकारच्या केंद्रस्थानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले, की भाजप सरकारने प्रथमच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार केला. केवळ बाराबंकी जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या खात्यांत ८०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. देशभरातील शेतकऱ्यांचे हित केंद्र सरकारच्या केंद्रस्थानी आहे. गुरांच्या लसीकरणाचा १३ हजार कोटींची राष्ट्रीय मोहीम सुरू आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळे लोकांचा भाजपवर विश्वास बसल्याचा दावाही पंतप्रधान मोदींनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.