chikmanglur onion 
देश

आयात कांदा खपवायचा कसा?

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - कांद्याच्या टंचाईमुळे दरवाढीची कोंडी सहन करणाऱ्या केंद्र सरकारची आता जादा उपलब्धतेनंतर पुन्हा कोंडी झाली आहे. टंचाईच्या काळात ३३ हजार टन कांद्याची गरज सांगणाऱ्या राज्यांनी माघार घेऊन सुधारित मागणी फक्त १४ हजार टनांवर आणली आहे. यामुळे धाबे दणाणलेल्या केंद्राने राज्यांना मागणीचा फेरविचार करण्यास काल सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी ग्राहक कल्याण मंत्रालय, तसेच आसाम, महाराष्ट्र, हरियाना, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ आदी बारा राज्यांची बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत आयात दरानुसारच राज्यांना कांदा देण्याची आणि वाहतूक खर्चही सोसण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयात होऊन मुंबईत ४९ ते ५८ रुपये प्रतिकिलो दराने कांदा उपलब्ध झाला आहे. याच दराने राज्यांना कांदा देण्याची तयारी असल्याचे पावसान  यांनी सांगितले. 

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात २५ टक्के घट झाली. तसेच, खरिपाचे लागवड क्षेत्रही घटले. 

भारतीय कांदा स्वस्त
राज्यांनी मागणी घटविण्यामागे बाजारातील उपलब्ध कांदा स्वस्त आणि आयात कांदा महाग, हे कारण असल्याचे सांगितले जाते. सोबतच, चवीमध्ये मोठा फरक आहे. यामुळे ग्राहकांनी आयात कांद्याकडे पाठ फिरविल्याने हा साठा कसा खपवायचा, हा केंद्रापुढे प्रश्‍न उभा ठाकला आहे. म्हणूनच, आज केंद्राने राज्यांशी चर्चा केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

IOB Recruitment 2025: IOB मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी होईल?

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT