अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारकडून 2019-20 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मांडला. या अर्थसंकल्पानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी प्राप्तिकर मर्यादेत केलेल्या वाढीचे स्वागत केले. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे मध्यवर्गीय जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.
शशी थरूर यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असले तरीदेखील ज्या शेतकऱ्यांची पाच एकर शेती आहे अशा शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देण्याच्या निर्णयावर त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. यामध्ये थरुर म्हणाले, या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय जनतेसाठी प्राप्तिकराच्या मर्यादेत जी वाढ केली आहे, या निर्णयामुळे मध्यमवर्गीय जनतेला याचा फायदा होणार आहे. तसेच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 6 हजार रुपयांचे मदतीवरून ते म्हणाले, जर ही रक्कम वर्षासाठी असेल तर प्रति महिन्याला ही 500 रुपये ही मदत असणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.