mirage
mirage 
देश

बालाकोट हल्ल्यावेळी सुमारे 300 मोबाईल होते ऍक्‍टिव्ह 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे जैशे महंमदच्या अड्ड्यांवर हल्ले केले त्या वेळी त्या भागात 300 मोबाईल ऍक्‍टिव होते, अशी माहिती पुढे आली आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याचा अधिकृत आकडा केंद्र सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. 

दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्याची परवानगी हवाई दलाला मिळाल्यानंतर "द नॅशनल टेक्‍निकल रिसर्च ऑर्गनायझेशन"ने (एनटीआरओ) तांत्रिक पाहणी केली. 26 फेब्रुवारीला मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी बालकोटवर बॉंबफेक केली. हवाई दलाच्या वैमानिकांनी जवळपास 1000 किलोंचे बॉंब फेकले. या वेळी जैशचा मुख्य आणि सुरक्षित स्थळ समजल्या जाणाऱ्या बालाकोटमध्ये टॉप कमांडर आणि अनेक दहशतवादी वास्तव्यास होते. 

तांत्रिक पाहणीच्या वेळी बालाकोटमध्ये 300 मोबाईल फोन ऍक्‍टिव्ह असल्याचे संदेश मिळाले होते. हे सर्व मोबाईल दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये होते, हेही तांत्रिक माहितीतून निष्पन्न झाले, त्यानंतरच हवाईहल्ले करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT