देश

जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना वाटतेय भीती

वृत्तसंस्था

श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या बदलीची भीती सतावत आहे. त्यांनी म्हटले आहे की, काश्मीरमध्ये किती दिवस राज्यपाल म्हणून काम करेल हे सांगता येत नाही. या जबाबदारीतून मला कधीही मुक्त करण्यात येऊ शकते. त्यांनी जम्मू-काश्मीरची विधानसभा भंग करण्याच्या केल्याच्या कारणामुळे त्यांना ही भीती वाटत असल्याचे त्यांनी बोलले आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरधारी लाल डोगरा यांच्या पुण्यतिथीला उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यपाल या पदावरून मला हटविण्यात येण्याची शक्यता कमी असली तरी, मला या राज्यातून दुसऱ्या राज्यात कधीही पाठवले जाऊ शकते. परंतु मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तुम्ही मला बोलवत रहा मी कायम येत राहील. 

दरम्यान, केंद्र सरकारला वाटत होते की, सज्जाद लोनना सरकार बनविण्यासाठी राज्यपालांनी संधी द्यायला हवी. परंतु, त्यांनी केंद्र सरकारचे न ऐकता विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळेच त्यांना ही भीती वाटत आहे. सत्यपाल मलिक यांनी गेल्या तीन महिन्यापासून जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT