Rajnath Singh
Rajnath Singh 
देश

सोशल मीडियावरून पाकची काश्‍मिरींना चिथावणी

पीटीआय

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील चकमकीच्या ठिकाणी पोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्‍मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत शुक्रवारी केला.


जम्मू-काश्‍मीरमधील बडगाम येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या वेळी जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन नागरिक मारले गेले. याबाबतचा मुद्दा काही सदस्यांनी आज सभागृहात उपस्थित केला. काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मत तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य सौगत रॉय यांनी मांडले. त्यावर बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, तेथील दहशतवादाविरोधात लष्कर त्यांच्या पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडत असेल, तेथील आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक करून दहशतवाद्यांना तेथून पळून जाण्यासाठी ते मदत करतात. हा नवा पायंडा आता या भागात पडत आहे. युवकांना चिथविण्यासाठी व्हॉट्‌सऍप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. जे गट काश्‍मिरी युवकांना भडकावण्याचे काम करीत आहेत, ते पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तान करीत असलेल्या चुकीच्या आवाहनाला युवकांनी भुलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT