mohan-bhagwat
mohan-bhagwat 
देश

...म्हणून जातीय राजकारण थांबणे गरजेचे : भागवत

वृत्तसंस्था

मुंबई : ''सध्या जातीय राजकारणामुळे जातीच्या नावावरून उमेदवाराला मतं दिली जातात. त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी जातीय राजकारण थांबणे गरजेचे आहे'', असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

सध्या देशात जातीय राजकारण करून निवडणुका लढवल्या जात आहेत. यावर भागवत म्हणाले, ''जीवनात व्यापर असो किंवा राजकारण सामाजिकरित्या दाखवण्यात आलेला नैतिक व्यवहार राजकारणात दिसायला हवा. त्यामध्ये बदल आणणे आवश्यक आहे. राजकारणात स्वत:हून बदल घडवला जाऊ शकत नाही. मात्र, राजकारणाच्या मार्गात जात असताना त्याप्रमाणे चालायचे असल्याचे त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे''.

ते पुढे म्हणाले, ''जातीय राजकारण संपवण्यासाठी आजपासून प्रयत्न केले पाहिजेत. सध्या निवडणुकांमध्ये जातीय राजकारण करत मते मागितली जातात. उमेदवाराच्या नावावरून जातीय राजकारण केले जाते. राजकारणात जर कोणाला टिकून राहायचे असल्यास तसे करणे गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तन करायचे असल्यास नावावरून केले जाणारे राजकारण बंद होणे गरजेचे आहे". 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT