Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu 
देश

एअर स्टाईकमध्ये 300 दहशतवादी मेले की झाडे पाडली : सिद्धू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी एअरस्टाईकवरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचा समाचार घेत एअरस्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी मारले गेले की झाडे पाडली, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी लष्कराच्या पराक्रमावरून राजकारण करू नका, असा सल्लाही दिला आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 250 ते 300 दहशतवादी मारल्याचे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. तर, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही भाजपने जाहीर केलेला आकडा आला कोठून हा प्रश्न उपस्थित केला आहे. सिद्धू यांनी ट्विट करत या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे.

सिद्धू म्हणाले, की 300 दहशतवादी मारले गेले की नाही? यामागील हेतू काय? दहशतवाद्यांना मारण्यासाठी गेला होता की झाडे उखडून फेकायला? हे फक्त निवडणुकीपूर्वीचे राजकारण आहे. भारतीय सैन्यावरून होत असलेले राजकारण बंद केले पाहिजे. जेवढा आपला देश पवित्र आहे, तेवढेच सैन्य पवित्र आहे. उँची दुकान, फीका पकवान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT