Opposition will Present non confidence motion against Modi government
Opposition will Present non confidence motion against Modi government 
देश

विरोधक आणणार मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता.18) सुरु होत आहे. या पावसाळी अधिवेशात सर्व विरोधीपक्ष एकत्र येणार असून, मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (मंगळवार) दिली. 

खरगे यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, काल (सोमवार) झालेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीत सहभागी झालेले सर्व पक्ष अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत सहमत झाले आहेत. सर्वच विरोधीपक्ष एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अविश्वास प्रस्तावात महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांची परिस्थिती यांसारख्या महत्वपूर्ण बाबींचा समावेश केला जाणार आहे.

तसेच आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा प्रामुख्याने घेतला जाणार जाणार आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या सभागृहात उपस्थित करण्याची आम्हाला संधी मिळेल, अशी आशा आम्ही करतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, निवडणुकांपूर्वी देण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. जमावाकडून हत्यांसारख्या घटना घडतात. असे असताना मात्र, मंत्री याचे समर्थनही करतात. हा मुद्दा आम्ही सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही खरगे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT