amit shah
amit shah 
देश

आमचीच सत्ता येईल आघाडीची गरजच नाही: शहा

वृत्तसंस्था

वाराणसी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल. त्यामुळे निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्ष अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

राज्यात उद्या (ता. 23) रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर शहा यांनी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणे टाळले आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे हीच आमच्या निवडणुकीची रणनीती असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांचे सर्वेक्षण आणि राजकीय विश्‍लेषकांनी केलेल्या भाकितांप्रमाणे या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेश पिंजून काढणाऱ्या शहा यांनी विधानसभा निवडणुकीसाठीही जोरदार प्रचार केला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेचे निकालही तितकेच महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. याखेपेस भाजपसमोर समाजवादी पक्ष, कॉंग्रेस यांची आघाडी आणि बहुजन समाज पक्षाचे कडवे आव्हान आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने भाजपला कोणत्याही स्थितीत विजयी व्हावेच लागेल.

शहा म्हणाले

  • उत्तराखंड, गोव्यातही आमचेच सरकार येईल
  • पंजाबच्या निकालाबाबत भाष्य करणे कठीण
  • विजयी आमदारच "यूपी'चा मुख्यमंत्री निवडतील
  • समाजवादी पक्षामुळे राजकारणास जातीय रंग
  • कॉंग्रेसचे पंतप्रधान मोदींवरील आरोप निराधार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT