पुणे : ‘‘सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्यामुळे आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिलेला नाही. सध्या शरद पवार बारामतीमध्येच व्यस्त आहेत. वंचितसाठी सकारात्मक वातावरण असून यंदा आम्ही लोकसभेचे खाते नक्की उघडू,’’ असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची सुरुवात ॲड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशावरील कर्ज वाढले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती म्हणाले होते, की मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास लोकशाही संपेल, निवडणुका होणार नाहीत, संविधान संपेल, गल्लोगल्ली मणिपूरसारखी परिस्थिती दिसेल. त्यांची ही विधाने धक्कादायक आहेत. राज्यातील १२ मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट लढत आहे.
तेथे वंचितला फायदा होईल. सेक्युलर मतदार अशावेळी वंचितकडे वळणार असल्याचे दिसते. सर्वच मतदारसंघात मोठी अटीतटीची लढाई आहे. मोदी सरकारने कबूल केले आहे, की १७ लाख कुटुंबांनी भारत सोडला आहे. अनेकांवर निवडणूक रोखे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे ते परदेशात जाऊन बसले आहेत. अजानच्या भूमिकेमुळे मुस्लीम मतदार एकतर्फी मोरे यांना मतदान करतील. मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून त्यांना डावलले जाते होते. पुण्यातील उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार नाही.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.