शरद पवार
शरद पवार  
देश

केंद्र सरकार जनतेच्‍या सहनशीलतेचा अंत पाहतेय

सकाळ वृत्तसेवा

सातारा : खासदार शरद पवार आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सातारा दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. 

कोरोना काळात शरद पवार ज्या दिवशी बाहेर पडतील, त्यादिवशी सर्व काही सुरू झाले, अशी चर्चा असल्याच्या प्रश्‍नावर श्री. पवार म्हणाले, ""लॉकडाउनच्या काळात माझा सर्वाधिक वेळ लोकांना मदत करण्यात गेला. आता लॉकडाउन शिथिल होताना परराज्यातून आपल्याकडे मोठ्या संख्येने लोक येत आहेत, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील लोकांत कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. ते मुंबई नको, महाराष्ट्र नको, असे म्हणत असल्याचे जागरूक माध्यमांतून सगळीकडे पोचविले जात आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. लॉकडाउनमुळे राज्य सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर्ज काढले आहे. संपूर्ण देशात आर्थिक सुबत्ता असलेले मजबूत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. मात्र, कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.'' सहकारी संस्थांच्या निवडणुकात सुरक्षित अंतर न पाळले जाण्याने संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे. तो योग्य आहे, असेही श्री. पवार म्हणाले. 

दरवाढीचा परिणाम विविध घटकांवर 
पेट्रोल व डिझेलची दरवाढ दररोज होत आहे. देशाच्या इतिहासात इतक्‍या मोठ्या प्रमाणात कधीही इंधन दरवाढ पाहिली नव्हती. देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांसह विविध घटकांवर दिसत असतो; पण लॉकडाउनच्या काळात लोकांनी शासनाच्या विरोधात बोलणे सोडले आहे. त्याऐवजी परिस्थितीशी दोन हात करत जनता सर्व काही सहन करत आहे. नेमक्‍या याच स्थितीचा गैरफायदा केंद्र सरकार घेतंय, अशी टीकाही श्री. पवार यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT