नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज (शनिवार) सकाळी टि्वटरवरुन दिली. यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्वराज यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, 'नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर महिन्याभराच्या आत सुषमा स्वराज यांनी सरकार निवासस्थान रिकामे केले आहे. ८, सफदरजंग लेन मार्गावरील मी माझे सरकारी निवासस्थान सोडले आहे. आता मी आधीचा पत्ता आणि फोन नंबरवर उपलब्ध नसेन.'
केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्या सहभागी झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुषमा यांनी पक्षाच्या आग्रहानंतर ही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी जयशंकर प्रसाद यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. सुषमा स्वराज यांनी आपले शासकिय निवासस्थानसुद्धा सोडले आहे. सुषमा स्वराज यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून बजावलेल्या सेवेबद्दल टि्वटरवर अनेकांनी सुषमा स्वराज यांचे कौतुक केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.