देश

`स्वाभिमानी` ची एक्सप्रेस भरकटली

राजकुमार चाैगुले

बानमोर मध्यप्रदेश - नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासाठी सोडण्यात आलेली खास रेल्वेची स्वाभिमानी एक्सप्रेस परतीच्या मार्गावर भरकटली. नियोजित मार्गाऐवजी भलत्याच मार्गावर रेल्वे गेल्याने रेल्वेचा गलथानपणा समोर आला.

सकाळी ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी हाताला येईल त्या वस्तूची फेकफेकी करून निषेध व्यक्त केला. रेल्वेसमोर आडवे होऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. यासाठी खास रेल्वे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने गेली होती. येताना मथुरा कोटाटा मार्गे कल्याण तेथून पुणे असा मार्ग होता. मध्यरात्री मथुरेतून रेल्वे भरकटली. ती परत आग्राच्या दिशेने गेली. पहाटे चार वाजता चहासाठी आचाऱ्याने स्टेशन कोणते आहे हे पाहिल्या नंतर चुकीच्या सिग्नल मुळे रेल्वे 160 किलोमीटर मार्ग बदलून आल्याचे लक्षात आले. शेतकऱ्यांनी स्टेशन मास्टरला विचारताच तुम्ही इकडे कुठे आलात असा उलटा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला. रेल्वे काय आम्ही चालवतोय काय असे सांगत शेतकऱ्यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. दोन तास गोंधळ झाल्यानंतर गाडी झाशी कडे रवाना झाली. खासदार राजू शेट्टी यांनी या बाबत रेल्वेमंत्रालययकडे तक्रार केली आहे. 

या रेल्वेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी ही होत्या. आम्हाला परतीच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप झाल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सागर संभू शेटे यांनी दिली

आता ही रेल्वे मनमाडच्या दिशेने धावत आहे अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT