rajnath singh1.png
rajnath singh1.png 
देश

"वाद आता चर्चेने सुटेल याची हमी नाही"; राजनाथ सिंहाच्या वक्तव्याचा अर्थ काय

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

लडाख- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसीय लडाख आणि जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. 15 जूनच्या संघर्षानंतर ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज(17 जून) लडाखमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. जवानांशी बोलताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. 

भारतात गरीबी कमी झाली; संयुक्त राष्ट्राचा अहवाल
आतापर्यंत आपली चीनशी जी चर्चा झाली आहे, त्याने वाद मिटायला पाहिजे. पण, कुठंपर्यंत हा वाद निवळला जाईल, याची हमी देता येत नाही. मात्र, मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. जगातील कोणतीही शक्ती भारताचा इंच भूभागही आपल्यापासून घेऊ शकत नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. सिंह यांच्या 'हमी नाही' या वक्तव्यामुळे देशात वेगवेगळ तर्कवितर्क लावले जात आहेत. सिंह यांच्यासोबत संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हेही त्यांच्यासोबत होते. 

भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याने सर्व जगाला शांततेचा संदेश दिला आहे. आम्ही कधीच कुणा देशावर हल्ला केला नाही किंवा दुसऱ्या देशाचा भूभाग आमचा असल्याचा दावा केला नाही. जग हेच एक कुटुंब आहे, या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, असं राजनाथ सिंह म्हणाले. आम्हाला आमच्या देशाच्या सैनिकांवर गर्व आहे. आज मी जवानांमध्ये उभा असल्याचा मला अभिमान वाटतो. जवानांनी देशासाठी आपला जीव पणाला लावला असल्याचं ते म्हणाले.

अमेरिका चीनला देणार दणका; कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर व्हिसा बंदीची शक्यता
भारत आणि चीन दरम्यान लष्कराच्या कमांडर स्तरावर (ता. 15) 14 तास चाललेल्या चर्चेत चीनने फिंगर 4 ठिकाणाहून सैन्य माघारीस नकार दिल्याचे समजते. गलवान खोरे, हॉटस्प्रिंग आणि गोग्रा भागातून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय सहमतीने झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी भारत आग्रही आहे. सैन्य माघारीबाबत चीन कडून होणारी टाळाटाळ आणि पूर्वानुभव लक्षात घेऊन भारतीय लष्कराने पूर्व लडाख सीमेवर चीनची संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी ६० हजार जवान सज्ज ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. 

दरम्यान, 15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनने आपली हानी जाहीर करण्यास नकार दिला आहे. संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक स्फोटक बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये कमांडर जनरल स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांनी लडाखच्या काही भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT