नवी दिल्ली ः दहशतवादाच्या विरोधात कशा प्रकारे लढा द्यायचा याबाबत चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व जगाने एकत्र येऊन ठोस कृती करण्याची सध्या गरज आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले.
अर्जेटिनाचे अध्यक्ष मौरिसियो मॅक्री यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना मोदी यांनी वरील मत मांडले. ""दहशवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात कच खाणे म्हणजे एकप्रकारे दहशतवादाला पाठिंबा दिल्यासारखेच आहे. त्यामुळे दहशतवाद रोखण्यासाठी काय करायला हवे, यावर चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे,'' असे मोदी म्हणाले. या वेळी मोदी आणि मॅक्री यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या दरम्यान दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.