railway accident
railway accident  
देश

युवकांच्या प्रसंगावधानाने टळली रेल्वे दुर्घटना

वृत्तसंस्था

शांतिनिकेतन - रेल्वे रूळ तुटल्याचे लक्षात येताच दोन युवकांनी चालकाला रेल्वे थांबविण्यास सांगितल्याने आज वीर भूम जिल्ह्यात मोठी दुर्घटना टळली. हे दोघे जण फोनवर बोलण्यासाठी रेल्वे रुळाजवळ आल्यानंतर त्यांना प्रणतिक ते बोलपूर रेल्वे स्थानकादरम्यान रूळ तुटल्याचे लक्षात आले. ज्या वेळी त्यांना येथून पॅसेंजर जाणार असल्याचे कळले, तेव्हा तातडीने त्यांनी आपल्या घरून लाल रंगाचा एक टॉवेल आणला आणि चालकाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावर जाऊन तो फडकविण्यास सुरवात केली. त्यानंतर चालकाने तातडीने गाडी थांबविली; मात्र दोन बोगिंनी तत्पूर्वीच हे तुटलेले रूळ ओलांडले होते.

रेल्वेची मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल पूर्व विभागाच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या दोन तरुणांचे कौतुक केले. त्यानंतर तासाभरात हे रूळ दुरुस्त करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT