Exam  esakal
एज्युकेशन जॉब्स

कमी गुण पडलेल्यांना श्रेणी सुधारण्याची संधी!

कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.

तात्या लांडगे

कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.

सोलापूर : कोरोनातील विविध अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा सुरुवातीला अभ्यास होऊ शकला नाही. काही महिन्यांपासून ऑफलाइन वर्ग सुरु झाले, परंतु पूर्ण अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्गातून शिकविता आला नाही. त्यामुळे कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच आजारपणामुळे परीक्षा (Exam) देता न आलेल्यांसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैअखेरीस होईल.

कोरोनाची (Corona) एकापाठोपाठ येणारी लाटा, विषाणूचा वाढता संसर्ग, घरातील कोणी ना कोणी आजारी, ऑनलाइन शिक्षणासाठी (Online Education)अनेक अडचणी, प्रवासावर कडक निर्बंध अन्‌ शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी वाहतूक सुविधा अपुरी, ऑफलाइन शाळा बहुतेक दिवस बंदच, अशा विविध अडचणींचा सामाना विद्यार्थ्यांना करावा लागला. या पार्श्‍वभूमीवर बोर्डाने प्रथमच विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिला. वाहतूक सुविधा अपुरी आणि कोरोनाचा धोका टळला नसल्याने "शाळा तिथे केंद्र' असा पर्याय शोधला. 25 टक्‍के अभ्यासक्रमही कमी केला. या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण खूपच कमी झाले. दुसरीकडे कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे कॉफी प्रकरणांची पडताळणीवरीही मर्यादा आल्या आहेत. तरीही, विद्यार्थ्यांनी विशेषत: होतकरू, हुशार विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर सोडविल्यास त्यांना पुढील शिक्षणासाठी कोणत्याही अडचणींचा सामना कराव्या लागणार नाहीत. पुस्तकात अथवा कोणाच्यातरी सांगण्यावरून उत्तरे लिहून टक्‍केवारी वाढेल, परंतु त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नसेल, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. बोर्डाने कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी सुधार योजना लागू केली असून त्यातून विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळविता येतील. तरीही, विद्यार्थ्यांना अजूनही परीक्षेसाठी खूप वेळ असून तोवर परीक्षेची जोरदार पूर्वतयारी करावी, जेणेकरून परीक्षेत तणाव राहणार नाही.

कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेच्या माध्यमातून बोर्डाकडून फेरपरीक्षेच्या दोन संधी दिल्या जातात. आजारपणासह अन्य कारणास्तव परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसह आता होणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षा होईल. जुलैअखेरीस परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे.

- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

श्रेणी सुधार योजना काय आहे?

दहावी अथवा बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा घेतली जाते. काही विद्यार्थ्यांची पूर्वतयारी झालेली नसतानाही त्यांना परीक्षा द्यावी लागते. कौटुंबिक अथवा वैयक्‍तिक कारणास्तव त्यांना चांगले गुण घेता येत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत अडथळा निर्माण होतो आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. त्या विद्यार्थ्यांना गुणांची टक्‍केवारी वाढविण्यासाठी पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या पुढील परीक्षेत पुन्हा बसण्याची संधी बोर्डाकडून उपलब्ध करून दिली जाते, अशी ही श्रेणी सुधार योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

U19 Asia Cup: १७ चौकार, ९ षटकार अन् डबल सेंच्युरी! भारताच्या अभिज्ञान कुंडूने रचला इतिहास, कोणालाच न जमलेला केला पराक्रम

Jio Recharge Offer : महिन्याचा रीचार्ज फक्त ₹103! मोफत OTT आणि AI सब्स्क्रिप्शन; Jio चे Happy New Year साठी 3 जबरदस्त प्लॅन

Latest Marathi News Live Update : लातूर तालुक्यात डोंगर पोखरून जमिनीची चाळण; तहसीलदारांचे दुर्लक्ष, मंत्री बावनकुळे आज लातूर दौऱ्यावर, कारवाई होणार का?

Chandrapur : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी; सावकारकीचा अमानवी चेहरा समोर..

SCROLL FOR NEXT