Pakistan
Pakistan 
ग्लोबल

जगाचा भारतावर विश्वास, आपल्यावर नाही; पाक मंत्र्याची कबुली

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्द्यावरून जगाचा भारतावर विश्वास आहे, आपल्यावर नाही अशी कबुली पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री ब्रिगेडियर इजाझ अहमद शाह यांनी दिली आहे.

इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी व्यापारसंबंध तोडले आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानचा थयथयाट होत आहे. पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. मात्र, कोणत्याही देशाने त्यांना पाठिंबा न देता हा दोन्ही देशांचा प्रश्न आहे असे सांगितले. तसेच काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही ठणकावले. आता यावर त्यांच्याच मंत्र्याने कबुली दिल्याने इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे.

इजाझ अहमद शाह म्हणाले, की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्द्यावरून पाठिंबा मिळविण्यात अपयशी ठरले. इम्रान खान यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी पाकिस्तानची छबी खराब करून ठेवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. काश्मीरमधील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू पुरवायच्या आहेत, असे आम्ही सांगितले तरी कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. सत्ताधारी पक्षाने देशाचे नाव उद्ध्वस्त केले. पाकिस्तानबाबत आता कोणच गांभीर्याने घेत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT