Bath Sakal
आरोग्य

मनाची शक्ती : अधिककाळ अंघोळ आरोग्यासाठी घातक

आपण मागील लेखात अंघोळ करताना कोणत्या चुका करतो याची माहिती घेतली. या आणि पुढील भागातही आणखी कोणत्या चुका होतात, त्याची माहिती घेणार आहोत.

सकाळ वृत्तसेवा

आपण मागील लेखात अंघोळ करताना कोणत्या चुका करतो याची माहिती घेतली. या आणि पुढील भागातही आणखी कोणत्या चुका होतात, त्याची माहिती घेणार आहोत.

- डॉ. हंसा योगेंद्र

आपण मागील लेखात अंघोळ करताना कोणत्या चुका करतो याची माहिती घेतली. या आणि पुढील भागातही आणखी कोणत्या चुका होतात, त्याची माहिती घेणार आहोत.

दररोज केस धुणे

केस किती वेळा धुवावे हे तुमच्या केसांचा पोत, स्थिती, तुमची जीवनशैली किंवा वेळापत्रक इत्यादी वैयक्तिक घटकांवर अवलंबून असते. काही लोक दररोज किंवा अंघोळ करताना प्रत्येक वेळी केस धुतात. दररोज केस धुणे आवश्यक नाही. तुम्ही केस वारंवार धुता तेव्हा त्यातील नैसर्गिक संरक्षणात्मक तेल काढून टाकता. यामुळे तुमच्या टाळूतून जास्त तेल निर्माण होते. खूप वेळा शॅम्पू केल्याने तुमच्या केसांचा सेबम, तुमच्या टाळूद्वारे तयार होणारे नैसर्गिक तेल निघून जाते. सेबम तुमच्या केसांच्या मुळांना ओलावा कमी होण्यापासून वाचविण्यास मदत करते. रोज केस धुतल्यामुळे टाळू कोरडी होऊन केस घट्ट होतात व ते तुटण्याची शक्यता अधिक असते. मोठ्या प्रमाणावर केस गळतीचे हे एक कारण असू शकते.

दक्षिण भारतात, जिथे हवामान खूप उष्ण आणि दमट असते, काही लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी डोक्यावर भरपूर खोबरेल तेल लावतात आणि ते दररोज धुतात.

तुमच्या केसांच्या प्रकारासाठी आणि हवामानाच्या परिस्थितीसाठी काय चांगले काम करते ते शोधणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे केस वारंवार धुण्याची गरज असल्यास साधे पाणी किंवा हर्बल घटकांनी बनवलेले नैसर्गिक शॅम्पू वापरणे चांगले.

त्वचा कोरडी पडते

अधिक काळ अंघोळ करण्याच्या सवयीमुळे त्वचेतील आवश्यक तेले निघून जातात. त्यामुळे जळजळ होते. ही तेले नैसर्गिक मॉयश्चरायझर आहेत. त्याचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा कोरडी होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेला व्रण पडून ती फिकट होऊ शकते. आपल्या अंघोळीची कालावधी १० मिनिटांपेक्षा कमी ठेवणे चांगले. त्वचा स्वच्छ आणि हायड्रेट करण्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे. शक्य असल्यास दिवसातून दोनदा अंघोळ करा. भारतीय परंपरेनुसार तुम्ही कोणत्या वेळेला अंघोळ करता त्याला खूप महत्त्व आहे. मन आणि शरीराला चैतन्य देण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अंघोळ करणे चांगले.

पायाच्या तळवांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

शरीराच्या अन्य भागांसोबतच पायाचे तळवे स्वच्छ करणे आवश्यक आहे. अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तळवे धुण्यास विसरतात. मुळात पायाला अधिक घाण लागल्यामुळे त्याला दुर्गंधी येत असते. आपले पाय योग्यरीत्या धुवावे. पाय वरच्या बाजूने, कडेने आणि तळपाय नियमितपणे साबण आणि पाण्याने धुतले पाहिजेत. वास येण्यापासून रोखण्याचा एक सोपा मार्ग आहे. पायाची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रॅबर किंवा दगड वापरू शकतात. त्या भागातील कडक झालेल्या त्वचेला त्याचा फायदा होतो. कधीकधी लोक अनवाणी चालतात किंवा खेळतात. त्यामुळे संक्रमण टाळण्यासाठी पाय स्वच्छ धुतले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT