धुळीच्या वादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० ते ६०० च्या दरम्यान नोंदवला गेला.
मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली असून दोन दिवस किमान तापमान आणखी कमी होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी घट झाली. कुलाबा इथं किमान १६.२ असंश सेल्सिअस तर कमाल २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळीच्या वादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० ते ६०० च्या दरम्यान नोंदवला गेला. हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. आखाती देशातून पाकिस्तान, राजस्थानकडे येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्यानं आणि वेग जास्त असल्यानं धुळीचं वादळ हे महाराष्ट्रात धडकलं आहे. या वादळामुळे कोकोण, मध्य महाराष्ट्रात धुक्याची स्थिती होती. तसंच तापमानाचा पाराही घसरला आहे. नाशिकमध्ये आज ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुंबईत आज अंदाजे १८ ते १९ अंश सेल्सिअस तापमान असेल असं हवामान विभागाने म्हटलं होतं. पुण्यात १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.