हिमालयातील (Himachal Pradesh) या मंदिरात नवरा-बायको एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत आणि गेले तर लगेच घटस्फोट होऊ शकतो.
हिमालयातील (Himachal Pradesh) या मंदिरात नवरा-बायको एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत आणि गेले तर लगेच घटस्फोट होऊ शकतो. या मंदिरात पती-पत्नी एकत्र मंदिरात पूजा करताना कधीच दिसणार नाहीत. होय, हिमाचलचे 'श्री कोटी' मंदिर (Shri Koti Temple) हे असं मंदिर आहे, जिथं जोडपं एकत्र देवीचं दर्शन घेऊ शकत नाही. असा समज आहे की, त्यांनी असं केलं तर ते लवकरच घटस्फोट घेतील.माँ दुर्गेची देशभरात वेगवेगळ्या अवतारात पूजा केली जाते. माँ दुर्गेची अनेक ठिकाणी मंदिरं आहेत. जिथं हजारो भाविक आपल्या मनोकामना घेऊन येतात. असेच एक दुर्गा मातेचे मंदिर हिमाचल प्रदेशात आहे. जिथं दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. पण, या मंदिरांची एक मोठी खासियत आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल...या मंदिरात पती-पत्नी एकत्र मंदिरात पूजा करताना दिसणार नाहीत. होय, हिमाचलचे 'श्री कोटी' मंदिर हे असं मंदिर आहे, जिथं जोडपं एकत्र देवीचे दर्शन घेऊ शकत नाहीत. असं मानलं जातं की, त्यांनी असं केलं तर ते लवकरच घटस्फोट घेतील. या मंदिराविषयी काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. श्री कोटी' मंदिर या नावानं हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील शिमला या सुंदर हिल स्टेशनमध्ये रामपूर नावाच्या ठिकाणी आहे. हे मंदिर श्री कोटी माता मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात माँ दुर्गा पूजा केली जाते. पण, पती-पत्नीला मंदिरात दुर्गेच्या मूर्तीचे दर्शन आणि पूजा करण्यास सक्त मनाई आहे. तुम्ही या मंदिरात जाऊ शकता, परंतु आधी बायको जाईल, मग नवरा किंवा मग आधी नवरा जाईल मग बायको असं एक-एक जण जाऊन तुम्ही देवीचे दर्शन घेऊ शकता.पौराणिक मान्यतेनुसार इथं नवरा बायको एकत्र पूजा का करत नाही? : नवरा बायकोनं मंदिरात एकत्र पूजा न करण्यामागं एक लोकप्रिय कथा आहे. असं मानलं जातं की, भगवान शिवानं त्यांचे दोन पुत्र, गणेश आणि कार्तिकेय यांना विश्वाभोवती फिरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर कार्तिकेय त्याच्या वाहनात फेरफटका मारण्यासाठी गेला, पण गणेश पालकांभोवती प्रदक्षिणा घालू लागला आणि अशा प्रकारे स्वतःला विजेता घोषित केले. असं केल्यावर, त्यानं उत्तर दिलं की हे विश्व त्याच्या पालकांच्या चरणी आहे, ज्यामुळे तो त्यांच्याभोवती फिरला. आणि कार्तिके प्रदिक्षणा घालायला निघून गेला.कार्तिकेय जेव्हा प्रदिक्षणा करुन ब्रह्मांडात आला, तोपर्यंत गणेशाचं लग्न झालं होतं. हे पाहून त्याला राग आला आणि त्यानं कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली. आणि तो म्हणाला की मला पाहण्यासाठी जे पती-पत्नी एकत्र येतील, ते नंतर कधीही सुखी होणार नाहीत. त्यामुळं आजही इथं पती-पत्नी एकत्र पूजा करत नाहीत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.