जळगाव

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला तर खबरदार ! 

देविदास वाणी

जळगाव  : आधिच अतिरिक्त पावसामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. त्यात रब्बीचा हंगाम सुरू होत असल्याने या काळात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी मंजूर कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा. वेळेवर व शेतकऱ्यांना पूर्णवेळ पूर्णदाबाने वीज द्या. पुढील आढावा बैठकीत कामे झाली पाहिजेत, कुठलीही सबब देऊन कामे रोखू नका, अशा कडक शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले. 

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधीक्षक अभियंता शेख, श्री. मानकर, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद ननावरे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, की जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना विजेचा सुरळीत पुरवठा व्हावा, याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून २०१९-२० या आर्थिक वर्षात १६ कोटी ७३ लाख निधीस प्रशासकीय मान्यता दिली असून, १४ कोटी २६ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यात १९४ कामे सुरू आहेत, तर अनेक कामे पूर्ण झाली आहेत. प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. विशेषत: जळगाव विमानतळ येथील वीजवाहिनी स्थलांतरित करणे आणि समांतर रस्ते तयार करण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर स्थलांतरित करणे, नवीन वीजवाहिन्या व केबल टाकण्याच्या कामासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे तातडीने पूर्ण करावीत. 
 

परीक्षाकाळात लोडशेडिंग करू नका 
शेतकऱ्यांना आवश्यक असलेले वीज कनेक्शन, तसेच शेतीला पाणी देण्यासाठी लागणारे ट्रान्स्फॉर्मर वेळेत देण्याची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या वेळी लोडशेडिंग होणार नाही याबाबत दक्ष राहावे. ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे ऑइल खरेदीसाठी मागील वर्षी ७५ लाख रुपयांचा निधी नावीन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून दिला होता. या वर्षी कोविडमुळे निधी नसल्याने या खर्चासाठी सर्व आमदारांच्या निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे सांगून स्वतःच्या निधीतून २० लाख रुपये देत आहे. 

तीन हजार कोटी ग्राहकांकडे थकबाकी 

जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व इतर सहा लाख ७६ हजार ९३१ ग्राहकांकडे तीन हजार ५९४ कोटी ५९ लाख ६० हजार रुपयांची थकबाकी आहे. यात कृषीसाठी एक लाख ९९ हजार ७५१ शेतकऱ्यांकडील तीन हजार ६३ कोटी ७२ लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT