कोकण

शासनाने बोटी उपलब्ध करून द्याव्यात - डॉ. मोकल

सकाळवृत्तसेवा

सावर्डे - मुंबई-गोवा जलवाहतुकीला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. फक्त परवानगी देऊन भागणार नाही. शासनाने कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या या संकल्पनेला बळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. चंद्रकांत मोकल यांनी केले. जिल्ह्यांतर्गत जलवाहतुकीत मोकल यांचे योगदान मोठे आहे. दाभोळ-धोपावे फेरीबोट त्यांनी यशस्वीपणे चालवली आहे. 

जलवाहतुकीबाबत मोकल म्हणाले की, लक्षद्वीपसारख्या ६५ हजार लोकसंख्या असलेल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्र आणि राज्य शासनाने निधी उपलब्ध करून केरळ ते लक्षद्वीप, अंदमान अशी सागरी जलवाहतूक सुरू केली आहे. सोळा बेटांपर्यंत पाच बोटी जलवाहतूक करतात. एक हजार प्रवासी क्षमता असणाऱ्या बोटीचा खर्च सरकार करत असल्यामुळे तेथील वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना परवडेल असे तिकीट दर आणि वाहतुकीला चालना मिळते. कोकणात जलवाहतुकीचा करार केलेल्या कंपन्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाहतुकीच्या बोटी या सिंगापूर येथे बनविल्या जातात. या बोटी पाण्यातून वेगाने धावणाऱ्या असतात. त्यामुळे त्याचा इंधनावर परिणाम होतो. वेगाने धावणाऱ्या बोटींना अधिक इंधन लागते. देखभाल खर्च, कामगार पगार, बॅंकेचे कर्ज, व्याज, शासनाचा कर या गोष्टीचा विचार केल्यास जलवाहतूक करणाऱ्या कंपन्याचा दम निघणार आहे.  जलवाहतुकीसाठी बोटी उपलब्ध करून दिल्यास प्रवासाचा तिकीट दर कमी ठेवता येईल. साधारणः ताशी ९० ते १०० किलोमीटर वेग असल्यामुळे प्रवाशांची जलवाहतुकीला पसंती मिळेल.

रोजगाराच्या संधी
जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी बंदराच्या विकासाला चालना देण्याची मागणी केली आहे. बंदरावर वीज, पाणी, प्रसाधनगृह, विश्रांतीकक्ष या प्राथमिक गरजांची आवश्‍यकता आहे. जलवाहतुकीमुळे किनारपट्टीच्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT