कोकण

ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे : नारायण राणेंचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधानांनी मला अहवाल द्यायला सांगितले आहे. सरकारने भरपाई द्यायला हवी. बेजबाबदार अधिकारी चिपळूण मध्ये ठेवू नका. सरकारने लोकांची जेवणाची व्यवस्था केली नाही.

चिपळून (रत्नागिरी) : राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही , एकूणच भयावह परिस्थिती आहे. या आपत्तीच्या काळात राज्याने मदत मागण्याआधि केंद्राने मदत केली. सध्याच्या एकूण परीस्थितीला आणि लोकांच्या अश्रूला राज्यातील प्रशासन जबाबदार आहे. ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे आहेत. आल्यापासून आपत्ती सुरुच आहे. असा खोचक टोला नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तीन बाजूने बाजारपेठेत पाणी शिरले आहे. पुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहे. मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली. आज राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) तळीये दौऱ्यानंतर चिपळूणात आले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून येथील पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. दोन दिवसांत आढावा घेऊन ही मदत जाहीर करणार असल्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहे.

याबाबत बोलताना राणे म्हणाले, पंतप्रधानांनी मला अहवाल द्यायला सांगितले आहे. सरकारने भरपाई द्यायला हवी. बेजबाबदार अधिकारी चिपळूण मध्ये ठेवू नका. सरकारने लोकांची जेवणाची व्यवस्था केली नाही.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने थेट मदत केली पाहिजे. मागील वर्षी सांगली, कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर नियमांच्या पलीकडे जाऊन आम्ही मदत केली आहे. राज्य सरकारने निकषा बाहेर जाऊन कोकणवासीयांना मदत दिली पाहिजे. असे ते म्हणाले.

दादा तुम्हीच आमचे वाली ; नारायण राणेंना चिपळूणातील व्यापार्‍यांची आर्त हाक

चिपळूणमधील जलप्रलयात बाधित झालेल्या पूरग्रस्त व्यापार्‍यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना “दादा तुम्हीच आमचे वाली आहात, तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकता” अशी आर्त साद घातली. यावेळी राणे यांनी व्यापार्‍यांना दिलासा दिला .रायगड येथील आपदग्रस्तांशी संवाद साधल्या नंतर राणे दुपारी चिपळूण शहरात दाखल झाले. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, निलेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

राणेंनी चिपळूणात प्रवेश केल्यानंतर व्यापार्‍यांशी संवाद साधला. एका व्यापार्‍यांनी पूरस्थितीची माहिती दिली. आतापर्यंतच्या 58 वर्षात अशाप्रकारे पूर आल्याचे मी कधीच पाहीलेले नाही. त्यासाठी उपाययोजना शहराच्या आजूबाजुला करण्याची आवश्यकता आहे. पहाटेच्या सुमारास पाणी वाढू लागले. दोन तासात कधी पाणी आले कळलेच नाही. त्या दोन तासातच होत्याचं नव्हतं झाले. दादा या परिस्थितीमधून तुम्हीच आम्हाला मदत करु शकता असेही त्या व्यापार्‍याने सांगितले.

आम्हाला यामधून बाहेर पडण्यासाठी तात्काळ मदतीची गरज आहे. कागदपत्रे आम्ही नंतर सादर करु, पण आधी मदत द्या अशी मागणी एका आपद्ग्रस्ताने केली. आमच्या डोक्यावरील कर्ज माफ करा आणि कमी टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी काहीतरी करा अशी मागणी यावेळी केली. व्यापार्‍यांच्या मागण्या ऐकुन घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे यांनी त्यांना दिलासा देत यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. तसेच तुमच्या लेखी मागण्या माझ्याकडे सादर करा, त्या त्वरीत सोडवू असेही आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

चिपळूणला येण्यापूर्वी राणे आधी सकाळी तळीयेमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून मीडियाशी संवाद साधला होता. ही अत्यंत दुखद घटना आहे. या दुर्घटनेत 87 लोक गेल्याचं कळतं. 44 मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT