MSCB  Electricity
MSCB Electricity sakal
कोकण

रत्नागिरी : भारनियमनामुळे पर्यटन हंगामाचा खेळखंडोबा

राजेश नागरे

पावस: पावस विभागात अचानक भारनियमन सुरू झाल्याने परिसरातील आंबा, काजू, फणस आदीचे उत्पादक तसेच हॉटेल व्यवसायिक, कॅनिंग व्यवसायिक हवालदिल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा भारनियमनमुक्त असल्याचे घोषित झाले. मात्र, बुधवारपासून (ता. २०) पावस भागात वीजपुरवठा खंडित होत होता.

आजही वीजपुरवठा दोन तास खंडित करण्यात आला होता. खंडित वीजपुरवठ्यामुळे आंबा, काजू, फणस उत्पादन कॅनिंग व्यवसायिक, फळप्रक्रिया उद्योगवाले अडचणीत येऊन पावस भागातील अर्थकारणाच्या केंद्रबिंदू असलेल्या फळप्रक्रिया उद्योगाला भारनियमनाचा प्रचंड फटका बसणार आहे. नाशिवंत फळांवर प्रक्रिया करण्याची कृती तत्काळ करावी लागते. मात्र, वीज पुरवठा खंडित होत असल्याने नाशिवंत माल फुकट जाण्याचा संभव वाढतो. त्यामुळे या भागातील अर्थकारणावर या विपरित परिणाम होणार आहे.

या सर्वाचा विचार करून कोणतेही तांत्रिक कारण पुढे करता वीजपुरवठा अखंड ठेवावा, अशी मागणी करणारे निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. जनभावना लक्षात घेऊन भारनियमन तत्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT