कोकण

गुहागरात जलसंवर्धन ही लोकचळवळ

सकाळवृत्तसेवा

गुहागर - गेल्या चार वर्षांत गुहागर तालुक्‍यात वनराई बंधारे बांधण्याची चळवळ रुजली आहे. बंधाऱ्यांमुळे जलसंवर्धन होते हा विचार येथे रुजविण्यात पंचायत समिती गुहागर, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. जलसंवर्धनातून कृषीउत्पन्न मिळविण्यासाठी भातशेतीनंतर भाजीपाला, कलिंगड लागवड, आदी कॅशक्रॉपकडे शेतकरी वळू लागला आहे. यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायतीने कमीत कमी १० बंधारे व तालुक्‍यात ६५० बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

वनराई बंधारा मिशन २०१७ साठी पंचायत समितीमध्ये ६४ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात १० बंधारे बांधण्याचा संकल्प सोडला. त्यामुळे तालुक्‍याने ६५० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या पिशव्या आता पंचायत समिती देणार नाही तर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानेच उपलब्ध होतील. लोकसहभाग व श्रमदानातून हे बंधारे उभारले जाणार आहेत. बंधारे बांधण्यासाठी साह्य आवश्‍यक असेल तर ग्रामपंचायतींनी गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, कृषी अधिकारी भरत चव्हाण, विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, भिमराव पाटील यांच्याशी संपर्क साधावा. एकमेकांना साह्यभूत होऊन तालुक्‍याचे वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन पंचायत समिती गुहागरने केले आहे. 

गतवर्षी ६४ ग्रामपंचायतींनी तालुक्‍यात ४७२ वनराई बंधारे बांधले होते. अनेक ठिकाणी जलसंवर्धनातून भाजीपाला, कलिंगड आदी लागवड करण्यात आली होती. वनराई बंधाऱ्यामुळे नळ पाणी योजना दिर्घकाळ सुरू राहील्या. शेतीतून उत्पन्न मिळाले. बागायतीला पाणी उपलब्ध झाले. असे फायदे होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यामुळे यावर्षी मागील वर्षापेक्षा दीडपट उद्दिष्ट सर्व ग्रामपंचायतीनी पुढे ठेवले. यापैकी १६९ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उद्दिष्टाकडे लवकरच वाटचाल पूर्ण होईल असा विश्वास गटविकास अधिकारी प्रकाश भोसले व पंचायत समिती कृषी अधिकारी भरत चव्हाण यांनी व्यक्त केला.

आरेगावाने केला विक्रम
आरे मधील ग्रामस्थांनी गेल्यावर्षी ७३ बंधारे बांधून विक्रम केला. या बंधाऱ्यांमुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी दुबार कृषी उत्पन्न घेतले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत: भेट देऊन आरे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व कृषी विभागाचे कौतुक केले होते. यावर्षी ग्रामपंचायतीने ७५ बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे. आज अखेर ग्रामपंचायतीने २० बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT