Ratnagiri sakal
कोकण

Ratnagiri : पाच वर्षांतील कमी पावसाची नोंद

राजापूर तालुका टंचाईचे ढग होणार गडद, भातशेतीला चांगलाच दिलासा

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून त्यातून भातशेतीला चांगलाच दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कमी पडलेल्या या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्याला पाणीटंचाईची झळ पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आतापासूनच तालुक्यातून वाहणार्‍या नद्यांसह वहाळ आणि अन् जलस्त्रोतांच्या ठिकाणचे पाणी शक्य आहे त्या ठिकठिकाणी अडवणे अन् मुरवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यामध्ये दमदारपणे पाऊस पडत आहे. त्यातून, तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना अन् कोदवली नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी पडणाऱ्या पावसाने भातशेतीलाही बाळसे आले आहे.

काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारली असली तरी यावर्षी पावसाने मात्र काहीसे सातत्य राखल्याचे चित्र आहे. तरीही सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या पावसाच्या नोंदीचा विचार करता गेल्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी आणि यावर्षी पडलेल्या पावसाचा विचार करता गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सप्टेंबरपर्यंत एक हजार मिमीपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कमी पडलेल्या या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा पोहचण्याची शक्यता वर्तवले जात आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी आतापासून नियोजनबद्धरित्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तालुक्यातील वाहणार्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांसह गावागावांतून वाहणार्‍या मोठमोठ्या वहाळांचे शक्य आहे त्या ठिकाणी पाणी अडवणे अन् मुरवून त्या भागातील भूगर्भातील जलस्त्रोत वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी पाणी अडवण्याच्यादृष्टीने उपाययोजना करता येणे शक्य आहे का, या दृष्टीनेही विचारविनिमय होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT