कोकण

काजूगर दरात १५० रुपयांनी घसरण

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - येथील स्थानिक मार्केटमध्ये काजूगराचे दर किलोमागे १०० ते १५० रुपयांनी कोसळले आहेत. याचा बागायतदारांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.

काजू बीला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू लागवड झाली. पारंपरिक शेती व्यवसायाला आंबा पिकाबरोबरच काजूच्या उत्पन्नाची जोड मिळाली. गेल्यावर्षी चांगल्या काजूगराला सरासरी ८०० ते ८५० पर्यंतचा भाव मिळाला होता. त्यामुळे काजू बीला १५० ते १७० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, काही व्यावसायिकांकडे अजूनही गेल्यावर्षीची काजू बी शिल्लक आहे. परदेशातूनही काजूगराची मागणी घटली आहे. बाजारपेठेमध्ये काजूगराचे दर कोसळले आहेत. काजू बीच्या हंगामाला आता सुरवात होत आहे. सुरवातीला स्थानिक बाजारपेठेत काजू गराला सरासरी ६०० रुपये भाव मिळू लागला आहे. येत्या काळात हा दर आणखी घसरून त्याचा परिणाम काजू व्यावसायिकांबरोबर बागायतदारांवरही होण्याची भीती आहे. 

बाजारपेठेतील तयार मालाची घसरण अशीच सुरू राहिली, तर त्याचा परिणाम सर्वांवरच होणार आहे. काजू प्रक्रिया केल्यानंतर गर पडत्या भावात विकावा लागला, तर उद्योजकांचे गणित बिघडणार आहे. त्यामुळे नाईलाजाने काजू बीला कमी किंमत द्यावी लागेल. याचा फटका थेट बागायतदाराला होईल. 
- दीपक शिंदे,
बागायतदार, अनारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT