कोकण

संरक्षक कठडे नसल्याने गोळपचा उतार धोकादायक

CD

rat०८२६.txt

बातमी क्र..२६ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat८p२३.jpg ः
८१३६१
पावस ः रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावरील गोळप उतारावर संरक्षण कठडे नसल्यामुळे दयनीय अवस्था.
--
गोळपचा उतार धोकादायक

अपघात वाढले ; पोलिसांच्या निवेदनाकडे बांधकामचे दुर्लक्ष

पावस, ता. ८ ः रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावरील गोळप उतारावर रस्त्यालगत संरक्षक कठडे नसल्याने आत्तापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. १५ ते २० जणांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यावर वाहनांचे संरक्षण करण्यासाठी कठडे बांधण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
रत्नागिरी ते पावस हा सागरी मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. त्याचबरोबर पर्यटनक्षेत्राला अनेकजण आवर्जून भेट देत असतात. गोळपधार ते गोळप पूल या दरम्यान संपूर्ण उतार आहे. या रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे नसल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे साईडपट्टीचा अंदाज येत नसल्याने गाडी रस्ता सोडून बाहेर जाते. त्यावेळी वाहने खोल भागात जाऊन अपघात होतो. उतारावर कुठेही संरक्षण भिंत नसल्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने संरक्षक भिंत बांधण्याबाबत निवेदन दिले आहे; परंतु त्या निवेदनाला बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT