कोकण

मोबाईल टॉवर बंदमुळे गैरसोय

CD

87761
कणकवली : येथील अधिकाऱ्यांना कळसुलीवासीयांना निवेदन दिले. यावेळी कल्पेश सुद्रिक आदी.


मोबाईल टॉवर बंदमुळे गैरसोय

कळसुलीतील समस्या; संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन

कणकवली, ता.८ : कळसुली (ता.कणकवली) येथील बीएसएनएलचे दोन्ही टॉवर वारंवार बंद पडत असल्‍याने मोबाईल ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्‍यामुळे येथील टॉवरची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी पंच सदस्य कल्‍पेश सुद्रीक यांनी केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी आज उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांना दिले.
निवेदनात म्‍हटले की, कळसुली गावात हर्डी आणि प्राथमिक आरोग्‍य केंद्र येथे बीएसएनएलचे टॉवर आहेत. गावात अन्य कंपन्यांचे नेटवर्क नाही. त्‍यामुळे हे टॉवर बंद झाल्‍यानंतर ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, बँक, पोस्ट आदींमधील कामकाज ठप्प होत आहे. तसेच ग्राहकांचीही मोठी गैरसोय होत आहे. कळसुली गावची लोकसंख्या साडे तीन हजार आहे. त्‍यामुळे येथील टॉवरची तातडीने दुरूस्ती करावी. दरम्‍यान, बीएसएनएलचे उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांनी कळसुलीतील विस्कळीत मोबाईल सेवेची तक्रार तातडीने दूर केली जाईल, अशी ग्‍वाही दिल्‍याची माहिती श्री.सुद्रीक यांनी दिली. दरम्यान, यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रुझाज फर्नांडीस, मोहित सावंत, अक्षय मुरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT