कोकण

रत्नागिरी ः दै. सकाळ रत्नागिरी आवृत्तीचा वर्धापनदिन आज

CD

पान १ साठी

१७३५


‘सकाळ’च्या वर्धापनदिनी ‘अभंगवणी’
रत्नागिरी कार्यालयाचा आज वर्धापनदिन; ३४ वर्षांची विश्वासार्ह परंपरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः ‘सकाळ’ रत्नागिरी आवृत्तीच्या ३४ व्या वर्धापनदिनी उद्या (ता. १०) रसिकांना सप्तसुरांची मेजवानी मिळणार असून रसिक भक्तिरसात डुंबणार आहेत. या निमित्त वाचकांसाठी सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत स्नेहमेळावा आणि त्यानंतर रत्नागिरीतील गायकांचा सप्तसूर मुझिकल्स प्रस्तुत अभंगवाणी कार्यक्रम सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळात आयोजित केला आहे. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
‘सकाळ’ सातत्याने नवनवे उपक्रम राबवित आहे. रत्नागिरीत गेली ३४ वर्षे ‘सकाळ’ची पाळेमुळे चांगलीच रूजली आहेत. सामाजिक कार्यातही अग्रेसर भूमिका घेतली आहे तसेच मच्छीमार, आंबा, काजू बागायतदारांचे प्रश्न, रत्नागिरीतील विविध नागरी समस्यांवर लेखन करून जनमानसात ‘सकाळ’ने विश्वासार्हता प्राप्त केली आहे. खात्रीशीर व निःपक्षपाती बातम्यांमुळे ‘सकाळ’ लोकप्रिय ठरला आहे.
वर्धापनदिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स प्रस्तुत ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रम सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होईल. यामध्ये गायक कलाकार आहेत हेमंत देशमुख, नरेंद्र रानडे, करुणा पटवर्धन. त्यांना साथसंगत तबला अभिषेक भालेकर, हार्मोनियम निरंजन गोडबोले, तालवाद्य सुहास सोहोनी करणार असून, निवेदन वामन जोग करणार आहेत. सप्तसूर म्युझिकल्स रत्नागिरी ही संस्था रत्नागिरीतील नवोदितांना रंगमंचावर संधी देण्यात अग्रेसर आहे. या संस्थेतर्फे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथेही गेली पाच वर्ष सप्तसूरचे सादरीकरण होत आहे. गेली चार वर्ष परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस यांच्या संजीवनी गाथा या अभंग गाथेतील अभंगांची राज्यस्तरीय स्पर्धा घेत आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. सप्तसूर म्युझिकल्स ही संस्था उभी होण्यामागे संस्थेचे मुख्य पदाधिकारी पदाधिकारी निखिल रानडे, संतोष आठवले आणि संस्थेचे सर्वेसर्वा निरंजन गोडबाले तसेच श्रीनिवास जोशी, राजेंद्र पटवर्धन, हेरंब जोगळेकर आदींचा मोलाचा वाटा आहे. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी ‘अभंगवाणी’'' कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व दिले आहे. श्री. मलुष्टे यांनी रत्नागिरी शहरात विविध समाजोपयोगी कामे केली आहेत. त्यात मोफत पाणीपूरवठा, प्रभागातील कचरा स्वखर्चाने उचलण्याची मोहिम, पाणपोई असे उपक्रम राबवले आहेत.

सप्तसूरचे अष्टपैलू कलाकार
सप्तसूर म्युझिकल्सचे संस्थापक निरंजन गोडबोले रत्नागिरीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रमात ऑर्गनसाथ, संवादिनीसाथ केली आहे. याच ग्रुपचे कलाकार हेमंत देशमुख हे प्रसिद्ध गायक, उत्तम ऑर्गन वादकही आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी गायन व नामवंत गायकांना ऑर्गनसाथही केली आहे. नरेंद्र रानडे हे आकाशवाणी मान्यता प्राप्त सुगम संगीत गायक आहेत. त्यांनी गुरु पंडित भालचंद्र रानडे, पंडित प्रसाद गुळवणी आणि विश्वनाथ ओक यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. हिंदी सारेगमप या कार्यक्रमात त्यांनी गायन केले असून अनेक प्रोग्रॅाम व रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी गायन केले आहे. रत्नागिरीतील युवा गायिका सौ. करुणा पटवर्धन या गेले अनेक वर्षे गुरू सौ. मुग्धा भट-सामंत यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. गांधर्व विद्यालयाची संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. अनेक संगीत नाटकात भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये गायनाचे विविध कार्यक्रम केले आहेत. या सर्व अष्टपैलू कलाकारांची मैफल रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळणार आहे.

‘कथा-दंतकथा’चे विशेष
वर्धापनदिनानिमित्त कथा दंतकथा ही पुरवणी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये कोंकणातील गावागावात असलेल्या कथावर आधारित सोळा लेख प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. माहितीपर अशी ही पुरवणी तयार केली आहे. याचे प्रकाशन उद्या करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT